बंद

    ऊर्जा परिवर्तन आराखडा

    • तारीख : 01/04/2025 -

    राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा आणि भरवशाचा दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठीची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे. शेतकरी व ग्रामीण समुदायांना लाभ होण्यासाठी नवीकरणीय ऊर्जानिर्मिती वाढविणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे, या उद्देशाने ही योजना दि. ८ मे २०२३ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेमुळे रोजगारनिर्मिती होत असून महावितरणची वीजगळती कमी करण्यास मदत होत आहे. या योजनेचा लाभ ४५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होईल. दिवसा वीज पुरवठा झाल्यामुळे महिलांचा शेतीच्या कामातील सहभाग वाढेल व त्यामुळे प्रामुख्याने त्यांना लाभ होईल. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने या योजनेची प्रशंसा केली असून इतर राज्यांना कुसुम-सी योजनेच्या अंतर्गत अशी योजना राबविण्याची सूचना केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी १६ हजार मेगावॅट क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 नवीकरणीय ऊर्जानिर्मिती वाढविणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात मोलाचे योगदान देईल. ही योजना कृषी उत्पादकता वाढवेल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि राज्याच्या ठोकळ राष्ट्रीय उत्पादनात भर टाकेल. या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विकेंद्रीत स्वरूपातील वीजनिर्मितीमुळे महावितरणला वितरणातील वीजगळती कमी करण्यास मदत होत आहे. या योजनेच्या अंतर्गत १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहेत.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे.

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा.